दि.30 सप्टेंबर रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले 05 मोठे महत्वपुर्ण कॅबिनेट निर्णय !

Spread the love

Mh-Tv@24 प्रतिनिधी [ cabinet nirnay dated 30 September ] : दिनांक 30 सप्टेंबर 2025 रोजी मंत्रीमंडळ बैठकीत 05 मोठे महत्वपुर्ण कॅबिनेट निर्णय घेण्यात आले आहेत .

01.कर्करोग उपचार करीता सर्वसमावेशक धोरण : नागरिकांना कर्करोग रोगावर दर्जेदार असे उपचार मिळावे या उद्देशाने त्रिस्तरीय कर्करोग उपचार सेवा निश्चित करण्यात आलेली आहे . याकरीता राज्यातील तब्बल 18 रुग्णालयांमधुन सदर रोगावर विशेषोपचार देण्यात येणार आहे .

02.ग्लोबल कॅपॉब्लिटी सेंटर : राज्याचे जागतिक क्षमता केंद्र – ग्लोबल कॅपॉब्लिटी सेंटर धोरण 2025 मंजुर करण्यात आले आहेत . सन 2047 पर्यंत विकसित भारत याकरीता  राज्याची गुंतवणुक व बहुराष्ट्रीय सहकार्यास प्रोत्साहन मिळणार आहे .

03.सौर कृषीपंप : वाणिज्यिक तसेच औद्योगिक व इतर वर्गवारीमधील ग्राहकांकडून वीज वापर अतिरिक्त विक्री कर आकारण्यास मंजूरी देण्यात आली असून , यामुळे सौर कृषीपंप वीज पुरवाठा करण्याकरीता निधीची उपलब्धता होणार आहे .

हे पण वाचा : राज्य कर्मचाऱ्यांना सुधारित वाहतुक भत्ता ( TA ) लागु करणेबाबत , GR निर्गमित दि.26.09.2025

04.महाजिओटेक : भु-स्थानिक तंत्रज्ञानाचा वापर करुन प्रशासन गतिमान करण्यासाठी महाजिओटेक महामंडळ स्थापन करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे .

05.फलटण जिल्हा सातारा येथे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय : सातारा जिल्ह्यातील फलटण येथे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय उभारणीस मंजूरी देण्यात आली आहे .

Leave a Comment