केंद्र सरकारकडून पेन्शन नियमांमध्ये बदल ; नविन नियमावली जारी !

Spread the love

Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Changes in pension rules by the Central Government; New regulations issued! ] : केंद्र सरकार मार्फत पेन्शन नियमांमध्ये महत्वपुर्ण बदल केला आहे , याबाबत नविन नियमावली जारी करण्यात आलेली आहे .

केंद्र सरकार मार्फत जारी केलेल्या नियमावलीनुसार , कर्मचारी व पेन्शन धारक यांच्या मृत्युनंतर त्यांच्या कुटुबांस / मुलांस पेन्शन कधी प्राप्त होईल , याबाबत केंद्र सरकारने खुलासा केला आहे .

सदर सुधारित नियमावली नुसार कर्मचारी / पेन्शन धारकांच्या पश्चात्य पेन्शन प्राप्तीकरीता गोंधळ निर्माण होणार नाही . तसेच यांमध्ये ज्या कर्मचाऱ्यांना 02 किंवा त्यापेक्षा अधिक पत्नी आहेत . अशा प्रकरणी निर्माण होणारे वाद कमी होणार आहेत .

कर्मचाऱ्यांच्या मृत्युनंतर त्याच्या मुलांस पेन्शन प्राप्तीचे कोणते अधिकार असतात याचा खुलासा करण्यात आला आहे . सुधारित नियमावली नुसार कर्मचारी / पेन्शन धारकांच्या मृत्युनंतर पेन्शन ही त्याच्या प्रथम जोडीदारास (विधवा / विधुर ) यांना मिळेल .

जर जोडीदार नसतील अशा प्रसंगी पेन्शन ही त्याच्या पात्र मुलांना व तेही नसतील तर त्यांच्यावर अवलंबून असणारे पालक किंवा अपंग भावंड यांना मिळेल असे स्पष्ट करण्यात आले आहेत .

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय संकलित PDF पुस्तिका फक्त 100/- रुपये मध्ये , लगेच खरेदी करण्यासाठी Click Here

बहुपत्नी असेल अशा प्रसंगी पेन्शन त्यांच्यामध्ये सम प्रमाणात वितरीत केली जाईल , जर पत्नी अपात्र ठरली ( कर्मचाऱ्याच्या / पेन्शन धारकाच्या मृत्युनंतर दुसरे लग्न आदी कारणांमुळे मुलांचा सांभाळ होत नसेल ) तर मुलांना पेन्शनचा हक्क मिळाला आहे .

पेन्शन प्राप्त करणारी विधवा पत्नीने दुसरे लग्न केले असेल , अशा प्रसंगी त्यास पेन्शन मिळणार नाही .

सरकारी / निमसरकारी कर्मचारी , शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी , पेन्शन धारक असाल तर खालील व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा .

Leave a Comment