Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Teachers who do not pass TET (Teacher Eligibility Test) will have to resign from their jobs. ] : शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण न होणाऱ्या शिक्षकांना सक्तीची नोकरी सोडावी लागणार का ? असा सवाल शिक्षकांना पडत आहे .
सर्वोच्च न्यायालयाच्या दिनांक 01.09.2025 रोजीच्या निर्णयानुसार पुढील 02 वर्षांमध्ये शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य असणार आहे . या निकालानुसार राज्यातील मागास वर्गीय बहुजन कल्याण विभाग मार्फत देखिल आदेश जारी करत , जे शिक्षक टीईटी उत्तीर्ण नाहीत अशांना सक्तीने निवृत्ती देण्याचा इशारा देण्यात आला आहे .
बहुजन कल्याण विभागाच्या दिनांक 17 ऑक्टोंबरच्या या आदेशामुळे तब्बल सव्वा लाख शिक्षक चिंतेत आहेत . सदर आदेशानुसार शिक्षकांना टीईटी परीक्षा उत्तीर्ण नसल्यास पदोन्नतीची संधी मिळणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहेत .
याशिवाय ज्यांचे निवृत्ती करीता 05 वर्षे पेक्षा अधिक वर्षे सेवा बाकी आहे अशांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे , अन्यथा निवृत्ती अनिवार्य असल्याचे सदर आदेशांमध्ये नमुद करण्यात आले आहेत .
हे पण वाचा : राज्यातील कर्मचाऱ्यांचे सेवापुस्तक संदर्भात महत्वपुर्ण GR निर्गमित दि.20.10.2025
सर्वोच्च न्यायालयाच्या सदर निर्णयावर राज्य सरकार मार्फत तसेच इतर बऱ्याच वैयक्तिक पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आलेल्या आहेत .

सरकारी / निमसरकारी कर्मचारी , शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी , पेन्शन धारक असाल तर खालील व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा .
- जनगणनेच्या कामांमध्ये सहभागी झालेल्यांना बदली रजा देणेबाबत शासन निर्णय !
- शिक्षण संचालनालयाचे आदेश कोर्टाने फेटाळले ; आता शाळा 30 जुन पासुन सुरु होणार ..
- दि.10 जुन 2026 रोजी राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात निर्गमित करण्यात आले 04 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR )
- मराठा समाजाला OBC प्रवर्गप्रमाणे सवलती व सोयी सुविधा देणे संदर्भात GR निर्गमित दि.05.06.2026
- शिक्षकांना TET परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी ही अंतिम मुदत ; अन्यथा सक्तीची सेवानिवृत्ती !
